Posts

Showing posts with the label Newspaper Articles

ए बी सी डी मैत्रीची !

Image
Friendship Day Special Issue 2010 शिंपल्यात पाणी घालून समुद्र कधी दाखवता येत नाही, हाताने काढलेल्या फुलाला सुगंध कधी येत नाही, नि ळ्या भोर गगनाचा अंत कधी होत नाही, अन् नाजूक अशा मैत्रीचा उल्लेख शब्दात होत नाही . यारी, दोस्ती, मित्र, मैत्रिणी यांच्यावर असे अनेक काव्य, कथा एवढच काय तर चित्रपट देखील आहेत .  याच संदर्भाचे असे असंख्य एस एम एस पण रोज येतात आणि मैत्रीदिनाला तर यांची उधाणच असते .  अगदी आपलं ज्यांच्यासोबत कोल्ड  वॉर  असतं ते पण मेसेज पाठवतात .  हे सग ळं  तर ठीक आहे पण एक गोष्ट सांगा दोस्तहो साला चीज क्या है ये दोस्ती ?  याचा नेमका अर्थ प्रत्येक जण आपल्या सोयीनुसार लावतो . खरंतर मैत्रीची परिभाषा आपल्या वयानुसार बदलत जाते .  आपण अगदी लहान असतो तेव्हा आपली आर्इ आपली पहिली मैत्रीण होते .  आर्इसोबतच घरातील सग ळे च म्हणजे बाबा, आजी, आजोबा, काका, काकू सग ळे च मित्र बनतात .  मग जस जसं आपण मोठं होतो शा ळे त जा ऊ  लागतो आपले मित्र होतात आणि मग सुरू होते ही मैत्रीची गाथा .  यात रूसवे फुगवे सब चलता है आणि ‘...

कोण जबाबदार? सरकार? च्छेऽ हो! आपणच!

Image
This is one of the cover stories which we did for a special issue somewhere around the time when the scams like "Adarsh", 2G and 3G came into picture. Our main theme was about the black money stored in the Swiss banks and corruption in general. In this article, ways to spend this black money are being discussed. February 10, 2011 देशात काहीही वार्इट घडले की आपण सरकारला जबाबदार  ठरवून मोकळे होऊन  जातो .   शेतकऱ्यांनी  आत्महत्या केल्या असो वा कांदा महागला असो ,   नक्षलवाद्यांचा  प्रश्न असो वा सुरक्षिततेचा ,  तेल  गळती  असो वा पेट्रोलचा प्रश्न असो ,  कोणताही राजकीय प्रश्न असेल वा अत्यंत साधा प्रश्न ,   सगळ्या  प्रश्नांचे उत्तर एकच ,  सरकार! ठीक आहे ना ,  असेल सरकार दोषी ,  आहेच .  पण आपला पण तेवढाच दोष नाही का ?  आपणच तर निवडून देतो या नेत्यांना .  त्यांनी दिलेली वचनं पूर्ण करावी ही अपेक्षा करणं हे चुकीचे का ?  जर त्यांनी दिलेली वचनं पूर्ण नाही केलीत तर पुन्हा एक ‘आदर्श’ होर्इ पर्...

मनापासून पुन्हा एकदा !

Image
Had written this Marathi article for my newspaper after almost two years. Date: November 29, 2012 प्रिय वाचकांनो, पुन्हा एकदा मनापासून नमस्कार! आपली भेट जवळपास एक वर्षाने होतेय. कॉलेज आणि करिअरच्या चक्रव्हयू मध्ये  मी कधी आणि कशी अडकले कळलेच नाही. खरं सांगायचं झालं तर मला शेवटचा लिहिलेला लेख देखील आठवत नाही. आठवडयातून तीन लेख, मग दोन, मग एक, मग महिन्यातून एक,   मग फक्त स्पेशल एपिसोड करत करत फक्त काही पुरवण्यांची बांधणी आणि मग एकदम फुल स्टौप असा काहीसा क्रम मात्र आठवतो. माझी टीमशी चार वर्षांची ओळख जेवढी आकस्मित तेवढीच  अविस्मरणीय आहे. “वाचलेले आर्टिकल आवडले, काही चांगले विषय माझ्याकडे आहेत, मेल करू का” विचारणे काय, एका मिटींगला गेली काय आणि टीमची झाली काय! सगळंच एकदम थ्रिलिंग वाटलं होतं सुरवातीला. आणि हो, जाम सटारली पण होती. कारण एकतं एवढया प्रख्यात वर्तमानपत्रात लिहायचं आणि तेही मराठीत! सवय नाही की सोबतीला तगडा असा मराठी शब्दसंच वा अनुभव नाही. बापरे! कठीणच! पण हळूहळू कळले की हा तर एक संवाद आहे, लाखों का एक की जुब...

मी एक काइट रन्नर !

Image
“मॅडम हे डी टी देशमुखचं गणिताचं पुस्तक. अगदी अप्रतीम. युनिवर्सिटीचा पेपर यातूनच येतो. हेच घ्या!” नमस्कार! मी छोटू! तसं खरं नाव शेखर, पण सगळेच मला छोटू म्हणूनच ओळखतात! एका पुस्तकांच्या दुकानात काम करतो. मी एका मोठ्या शहाराच्या एका छोट्याशा वस्तीत राहतो. गावाकडे काम मिळत नसल्याने माझे वडील रोजगारासाठी इथे आले. त्यांच्यापाठोपाठ आम्ही सगळेच आलो. माझे आर्इ वडील मिळेल ते काम करतात आणि माझे व माझ्या लहान भावाचे हट्ट पुर्ण करतात. मी सगळयांसारखाच अत्यंत सामान्य. सगळया मुलांसारख्या छोट्या अपेक्षा असलेला. जोपर्यंत शक्य होतं तोपर्यंत मला आर्इ­वडिलांनी शिकवलं. शाळेत जाणं, अभ्यास करणं मला आवडत असलं तरी नार्इलाजास्तव मला शिक्षण सोडावं लागलं. पैसा कमवायला मला मग माझ्या छोट्याश्या जगातून भव्य अश्या जगात पडावं लागलं. पुस्तकांची आवड असल्याने मी एका जुनी पुस्तकं  विकणाऱ्याकडे  कामाला लागलो. मग फावल्या वेळात मी दुकानातलीच पुस्तकं वाचायला लागलो. आज नेहमीप्रमाणे दुकानात बसलो असता माझ्या नजरेस एक द कार्इट रनर नावाचं पुस्तक पडलं. पुस्तकाचं ना...